Thursday, April 2, 2020

मित्रांनो अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना किशातून पैसे पडतात, घरामध्ये आपोआप तुळस उगवते, घरातील नारळ तडकते तसे पाहायला गेले तर या सामान्य घटना आहेत, परंतु ज्योतिषांच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्र ज्योतिषांमध्ये एक सहायक ग्रंथ मानला जातो. आज देखील कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्तित्व आहे, या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास भविष्यात आपल्या सोबत घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो. घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात, ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

१) खिशातून नाणे खाली पडणेकपडे घालताना किशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे, तुम्हाला भविष्यात धन लाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार रहावे. 

२) घरातील नारळ आपोआप तडकने :घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास असे समजावे की घरातील नाकरात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. 

३) घराजवळ आपोआप तुळस उगवणे : तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे.

४) आपोआप दुर्वा उगवणे : आपण ज्या दुर्वा श्री गणेशांना अर्पण करतो त्या दुर्वा जर आपल्या बागेमध्ये उगवल्यास समजावे की आता घरामध्ये कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. 

५) घरामध्ये मध पडणे : घरामध्ये मधाचे भांडे फुटून जर मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही, घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. घटनांचा आणि मनुष्यांचा आपापसात खूप जवळच संबंध असतो, हे वेळे नुसार व्यक्ती सोबत घडत असते. त्या पैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेवून येतात. तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात. या घटना आपल्या समोर कोणत्याही रुपात येऊ शकतात. परंतु वेळीच त्यांना ओळखणे खूप महत्वाचे आहे, या घटना आपल्या साठी कधी शुभ असतात, तर कधी अशुभ असतात, या घटना आपल्या जीवनाला प्रवाहित करतात.

६) चिमणी ने घरामध्ये घरटे बनवणे : चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपली पिल्ले जन्माला घालते, तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेता नंतर काही काळातच आपल्याला शुभ समाचार मिळण्यास सुरवात होते. आणि घरापासून संकटे देखील दूर राहतात त्यामुळे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो.  

७) सकाळच्या वेळी मांजरीनीचे पिल्ले दिसणे :

सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला कोणती गोड बातमी कळली, तर आपल्याला तो पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्या नंतर मांजराचे पिल्ले दिसले तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप शुभ संकेत आहेत. जर आपल्या सोबत असे घडले तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे.

८) मुंग्यांचे समूह दिसणे : मुंग्या जितके कष्ट करते तेवढे कष्ट कदाचित कोणीही करत नसेल, त्याच बरोबर मुंग्यांना समूहाचे प्रतीक मानले जाते. तसेच त्यांना एका लाईनमध्ये चालताना देखिल आपण पाहिलेच असेल, जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे आपल्या साठी शुभ संकेत आहेत. काही वस्तू आपल्या समोर येऊन निघून जातात, पण बऱ्याचदा आपले त्या वस्तूंमध्ये फारसे लक्ष देखील नसते. परंतु ह्या वस्तू आपल्याला समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगले घडणार असते. त्याचे ते संकेत असतात आता हा प्रत्येकाने मानण्यातला भाग असला तरी पूर्वजांनी जे लिहून ठेवले आहे. त्यानुसार काही वस्तू किंवा काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या गेल्या आहेत.

९) रस्त्यात पांढरी गाय दिसणे : हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे कुठेही पांढरी गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचे दर्शन झाल्याचे समजले जाते. 

१०) सकाळी उठल्या बरोबर नारळ म्हणजेच स्त्री फळाचे दर्शन होणे : सकाळी उठल्या बरोबर नारळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी ऐकू येणार आहे असे ते संकेत असतात कारण नारळाला हिंदू धर्मात व सामाजिक परंपरेत शुभ मानले जाते

११) प्रवास करताना दिसणारे शुभ संकेत : प्रवास करताना देखील काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत कधी जर प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मनाला जातो. 

१२) स्वप्नात हिरवा निसर्ग दिसणे : हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कोणालाही आवडेल, पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरी देखील ते शुभ मानले जाते. त्यातूनही हा हिरवेगार पणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही चांगले मानले जाते.